ही कविता मी ०९/०३/२००७ ला केली आहे...
किती वेडे माझे मन,
तुझ्यावरती जडले माझे मन,
आठवण येते प्रत्येक क्षण
प्रेम आहे माझ्यावरती म्हण...
चांगले होते आनंदी,
काय झाले एका-एकी,
एका क्षणात ते उडाले,
आणि तुझ्यापाशी येउन बसले...
विचारायला वाटते भीती,
माझी आहे तुझ्यावरती प्रीती,
सांगू कसे ती किती?
आहेत का कुठल्या रीती?
तुज्याच डोळ्यात माझे जग,
एकदा हो म्हणून बघ,
माझी होवून एकदा जग,
आनंद घेऊ जीवनाचा संग...
तू आहेस चांदणी,
होशील का माझी अर्धांगिणी?
आपण राहू जसे राजा-राणी,
जीवनात काय हवे अजून आणि?
कवी---> समीर जोशी
No comments:
Post a Comment