ही कविता मी मुक्तपीठ कम्युनिटी वरती दिलेल्या एका ओळीवरती केली आहे... धन्यवाद.....
सोडून गेलीस ज्या वळणावर,
तिथेच मी अजूनी आहे,
मन उदास माझे झाले,
तुझीच वाट पहात आहे...
हे जीवन म्हणजे आता,
कोंडमारा झाला आहे,
पाण्याबाहेरील माश्याप्रमाणे,
जगण्यासाठी तड्फ़ड चालू आहे...
आशा आहे लवकर येशील...
काळे ढग दूर करशील...
निराशलेल्या या मनावर..
आशेची तू ज्योत लावशील...
कवी--------> समीर जोशी...........
तारीख------> २७/०३/२०१०
No comments:
Post a Comment